फेडरेशन म्हणाले , वाढते शहरीकरण , झपाट्याने होत असलेला औद्योगिक विकास , कृषी क्षेत्रातील वीज ग्राहकाने मोठ्या प्रमाणावर सुरू केलेल्या विजेचा वापर हे लक्षात घेता या सर्व ग्राहकांच्या सेवेसाठी सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे .
नागपूर : स्मार्ट मीटर बसवल्यानंतर पुणे , मुंबई , नाशिक , नागपूर आदी महानगरांत वीज ग्राहकांच्या तक्रारी प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत . केवळ पुण्यात तीन महिन्यांत असंख्य तक्रारी फुगलेल्या बिलांबद्दल दाखल झाल्या आहेत . ग्राहक सांगतात की , वापर जसाच्या तसा असतानाही बिले ३ ते ७ पटीने वाढली , असा दावा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने केला . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी पत्रही लिहले
फेडरेशन म्हणाले , वाढते शहरीकरण , झपाट्याने होत असलेला औद्योगिक विकास , कृषी क्षेत्रातील वीज ग्राहकाने मोठ्या प्रमाणावर सुरू केलेल्या विजेचा वापर हे लक्षात घेता या सर्व ग्राहकांच्या सेवेसाठी सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे . गेल्या काही वर्षापासून महावितरणचे अस्तित्वात असलेले नेटवर्क फार जुने झाले असून त्याची कार्यक्षमता कमी झालेली आहे . त्यामुळे तांत्रिक स्वरूपाचे लॉसेस , अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे . जुन्या यंत्रणाचे सक्षमीकरण करणे
काळाची गरज आहे . सरकारने अपारंपारिक सोलर ऊर्जेची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करण्याचे धोरण स्वीकारलेले आहे . या धोरणाने कृषी व इतर ग्राहका स्वस्त वीज उपलब्ध होण्याकरिता मदत होणार आहे .
महावितरण कंपनीच्या आर्थिक , तांत्रिक , कायदेशीर बाबीचा विचार करत ३ कोटीच्या वर वीज ग्राहक व तिन्ही वीज कंपन्यातील ८६ कामगार , अभियंते , अधिकारी व ४२ कंत्राटी कर्मचारी यांच्या हिताच्या संरक्षण व्हावे या दृष्टीने हे निवेदन आपणास सादर करीत आहे



