By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: महावितरण ने चालवलेले जनतेचे आर्थिक शोषण व दिशाभुल तत्काळ थांबवावी ..अँड कांचनकन्होजा खरात
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > राजकीय > महावितरण ने चालवलेले जनतेचे आर्थिक शोषण व दिशाभुल तत्काळ थांबवावी ..अँड कांचनकन्होजा खरात
राजकीय

महावितरण ने चालवलेले जनतेचे आर्थिक शोषण व दिशाभुल तत्काळ थांबवावी ..अँड कांचनकन्होजा खरात

Prashant Ahiwale
Last updated: April 11, 2025 8:21 am
Prashant Ahiwale Published April 11, 2025
Share
SHARE

वीज वितरण ने 2012-13 पासून बसवलेले नवीन टेक्नॉलॉजीने बनविलेले वीज मीटर बसविले होते. तेव्हा सुद्धा सरकारने हेच सांगितले होते की, हे वीज मीटर अचूक व योग्य बिल ग्राहकांना देतील. एवढा मुबलक जनतेचा पैसा खर्च करून त्यात महाराष्ट्र सरकारवर 2024- 25 अखेरीस प्रत्यक्षात कर्जाचा बोजा 8 लाख 39 हजार कोटींवर गेला असताना 2012 – 13 ला बसविलेले मीटर सक्षम असताना देखील पहिल्यांदा टेंडर काढून प्री- पेड मीटर बसविण्याचे आदेश दिले. म्हणजेच प्री- पेड मीटरची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली असतील व काही ठिकाणी हे मीटर बसविले असतील. त्यातच आत्ताच्या अधिवेशनात मा. मुख्यमंत्री साहेबांनी अशी घोषणा केली की, प्री- पेड मीटर कोणालाही दिले जाणार नाहीत. आता नवीन टो. ओ. डी. वीज मीटर बसविले जाणार आहेत. घोषणा करून दहा-बारा दिवस सुद्धा झाले नाहीत आणि काही सरकारी कार्यालये व काही जिल्ह्यात जोडणीला सुरुवात देखील झाल्याची बातमी आली हे विशेषच, एवढ्या कमी वेळेत कसे नवीन मीटर तयार होऊ शकतात? हे समजणे कठीण आहे. मीटर नेमका कोणता प्री- पेड की ग्राहकांची दिशाभूल करून नवीन टो. ओ. डी. मीटरच्या नावाखाली प्री- पेड मीटर बसविणार आहेत का? तसेच महावितरण म्हणते की, ग्राहकांना आर्थिक भुर्दंड होणार नाही. परंतु हे पैसे जनतेच्याच करातून किंवा राज्य सरकारवर कर्ज काढून दिले जाणार ना? त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल तात्काळ थांबवावी.
तसेच टो. ओ.डी. मीटर द्वारे दिवसाच्या व रात्रीच्या वापराचे रीडिंग वेगवेगळे देणार त्यानुसार ग्राहकांना वीज दिले देणार आहात का? आणि असे असेल तर चक्क विज ग्राहकांची दिवसाढवळ्या राज्य सरकारकडून गरिबांची लुट होणार आहे. हे स्पष्ट दिसून येत आहे. यात राज्य सरकार द्वारे सक्तीने हे मीटर बसविलेच पाहिजे ही सक्ती का? हे म्हणजे एखाद्या उद्योगपतीला व त्यांच्या सबकॉन्ट्रॅक्टदारांना स्पष्ट फायदा देण्यासाठी जनतेची लुबाडणूक होणार आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे मा. राष्ट्रपती मॅडम व मा. राज्यपाल साहेब यांना विनंती की, या नवीन मीटर बसविण्यावर तात्काळ बंदी घालण्याचे आदेश करावेत तसेच मे. मुख्यन्यायाधीश साहेब हायकोर्ट मुंबई यांना विनंती की, स्पष्ट दिसत आहे की, महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा वाढणार आहे, त्याचबरोबर वीज ग्राहकांची लुट देखील होणार आहे. याचा आपण विचार करून सुमोटो दखल घेऊन ग्राहकांचे व राज्याचे रक्षण होईल असे आदेश करावेत. त्याचबरोबर सर्व मान्यवरांना विनंती की, पहिले मीटर सक्षम आहेत हे आपणच सांगत होता. मग हे नवीन मीटर बसविण्यासाठी राज्य व जनतेच्या डोक्यावर कर्जाचा बोजा कशासाठी? त्यामुळे नवीन वीज मीटर बसविण्याचे आदेश तात्काळ रद्द करावेत. अशी मागणी फलटण मधील सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात ताई यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

You Might Also Like

जातिनिहाय जनगणना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

भावी सरपंचांची धावपळ सुरू : गावातील चौकात , पारावर , शेतीच्या बांधावर चर्चांना उधाण

गर्व से कहो हम हिंदू है

हैदराबाद गॅझेटला मान्यता , मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला ? राज्यपालांच्या सहीनं GR काढणार

भारताकडून पाकीस्तानवर एअर स्ट्राईक , सैन्य दलाकडून ‘ ऑपरेशन सिंदूर ‘ यशस्वी ; भारतीय सशस्त्र दलांनी दहशतवादी छावण्यांवर अचूक केला हल्ला

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
फलटण

फलटण रनर्स फाऊंडेशन व नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी , फलटण यांच्या पुढाकारातून भव्य स्वच्छता उपक्रम

Prashant Ahiwale Prashant Ahiwale December 3, 2025
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील वाढीव सन्माननिधी वितरित मागणीला यश : पत्रकारांना आता दरमहा 20 हजार रुपये मिळणार
बाबासाहेब आंबेडकर हेच खरे घटनेचे शिल्पकार डॉ . नरेंद्र जाधव
फलटणमध्ये आज चर्मकार समाज वधू – वर मेळाव्याचे आयोजन
जिल्हा शाखा सातारा पूर्व अंतर्गत फलटण येथे भारतीय बौद्ध महासभा या मातृ संस्थेच्या नेतृत्वात तसेंच वंचित बहुजन आघाडी, समता सैनिक दल व तमाम फुले, शाहू, आंबेडकरी विचार जोपसणारे अनुयायी यांचे वतीने उद्या दिनांक 5 एप्रिल, 2025 रोजी सायंकाळी ठीक 5.30 वाजता, शुभ्र वस्त्र परिधान करून आपापल्या कुटुंबियां सह डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा फलटण या ठिकाणी एकत्र जमून बौद्ध राजा प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य यांचा 2329 वा जयंती महोत्सव उत्साहाच्या वातावरणात साजरा करायचा आहे.
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account