भारतीय सशस्त्र दलांनी ‘ ऑपरेशन सिंदूर ‘ सुरू केले , ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर हल्ला करण्यात आला – जिथून भारताविरोधात दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली जात होती आणि त्यांचे संचालन केले जात होते . एकूण नऊ ( ९ ) ठिकाणे लक्ष्य करण्यात आली आहेत
आपली कारवाई लक्ष केंद्रीत , मोजकी आणि स्फोटक स्वरूपाची नव्हती . कोणतीही पाकिस्तानी लष्करी सुविधा लक्ष्य करण्यात आलेली नाही . भारताने लक्ष्य निवडण्यात आणि कारवाईच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात संयम दाखवलेला आहे . ही पावले पाहीलगाममध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यानंतर उचलण्यात आली आहेत , ज्यामध्ये २५ भारतीय आणि एक नेपाळी नागरिकाची हत्या करण्यात आली . या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरले जाईल , या आपल्या वचनानुसार आम्ही पावले उचलत आहोत . ‘ ऑपरेशन सिंदूर’बाबतचा सविस्तर अहवाल सरकारकडून जाहीर केला जाणार आहे



