महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून सतत नवनव्या योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतले जात असून, या निर्णयांमुळे शेती आणि शेतकऱ्यांना प्रगतीचा नवा मार्ग मिळत आहे. राज्य सरकारकडून शेतीसाठी विविध अनुदाने दिली जातात, त्यात ‘सिंचन विहीर योजना’ हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. विशेष म्हणजे आता या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.



