By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: शहरी नक्षलवाद म्हणजे नेमकं काय ? – अॅड . प्रकाश आंबेडकर
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > राजकीय > शहरी नक्षलवाद म्हणजे नेमकं काय ? – अॅड . प्रकाश आंबेडकर
राजकीय

शहरी नक्षलवाद म्हणजे नेमकं काय ? – अॅड . प्रकाश आंबेडकर

Prashant Ahiwale
Last updated: July 14, 2025 11:19 pm
Prashant Ahiwale Published July 14, 2025
Share
SHARE

कामगारांच्या मोर्च्याला अर्बन नक्षलवाद म्हणणार का ? एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्या विषयावर लढा उभा केला त्याला तुम्ही अर्बन नक्षलवाद म्हणणार का ? शेतकऱ्यांनी शेतमालाला भाव मिळत नाही , म्हणून त्याविरोधात आवाज उठवला तर त्याला अर्बन नक्षलवाद म्हणणार का ? खाजगी सावकाराच्या विरोधात कारवाई करा , ही मागणी केल्यावर त्यांना अर्बन नक्षलवाद म्हणणार का ? सरकार नेमकं कोणाला अर्बन नक्षलवाद ठरवणार आहे ? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड . प्रकाश आंबेडकर यांनी केला . महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा विधानसभेत संमत झाला आहे . प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत राजगृहावर पत्रकार परिषद घेऊन या विधेयकाला स्पष्ट विरोध दर्शवला .  जन सुरक्षा विधेयक महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या ऐतिहासिक वाटचालीवर आघात करणारे असून , या विरोधात आम्ही न्यालयात लढा देणार.

ज्याच्याकडे शस्त्र , दारुगोळा आहे , त्याला तुम्ही नक्षलवादी ठरवू शकतात कारण , बेकायदेशीर मार्गाने तो राज्याला उलथू पाहतोय . बेकायदेशीर मार्गाने राज्य उलथवणाऱ्यांकडे शस्त्र , दारुगोळा आहे की नाही ते तपासले पाहिजे . शस्त्र , दारुगोळा आरएसएसवाल्यांकडे आहेत . त्यांनी सार्वजनिकरित्या ती जाहीर केली आहेत . त्यांच्यावर अर्बन नक्षलवादाची कारवाई करणार आहेत का ? हा मोठा प्रश्न आहे . जर एखाद्या सामान्य नागरिकाने आरएसएसच्या शस्त्र , दारुगोळा याची मोहन भागवत , नरेंद्र मोदी , देवेंद्र फडणवीस शस्त्रांची पूजा करताय याविरोधात न्यायालयात दाद मागितली आणि यांना अर्बन नक्षलवादी म्हणून जाहीर करा , अशी मागणी केली , तर त्या माणसाच्या मागे या सर्व राजकीय विरोधी पक्षांनी उभे राहिले पाहिजे . तरच तुम्ही खऱ्या अर्थाने विरोधक आहेत , हे दिसेल . असे स्पष्ट मत ॲड . आंबेडकर यांनी व्यक्त केले .

सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एके -४७ ( AK – 47 ) आणि टॉमी गन यांसारख्या शस्त्रांची पूजा करतानाचे फोटो सगळीकडे उपलब्ध आहेत . भारतीय सैन्यात विशिष्ट सैनिकांनाच ही शस्त्रे वापरण्याची परवानगी आहे . असे असताना आरएसएसकडे ही शस्त्रे कुठून आली ? सरकार त्यांच्यावर ‘ अर्बन नक्षल ‘ म्हणून कारवाई करणार आहे की नाही ? ” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांच्या शस्त्रपूजेच्या फोटोंवर विरोधी पक्षांच्या शांततेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले . ” ज्यांच्याकडे ही शस्त्रे आहेत , त्यांच्यावर या जनसुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई होणार आहे की नाही ? ” असा सवालही त्यांनी केला आहे . कायद्यानुसार पिस्तूल बाळगणे कायदेशीर आहे , परंतु एके -४७ आणि टॉमी गन यांसारखी शस्त्रे बाळगणे कायद्याने गुन्हा आहे आणि हे राज्य उलथवून टाकण्यासारखे आहे . आरएसएस ही शस्त्रे जवळ बाळगतेय , त्यावर या कायद्यांतर्गत आधी कारवाई करावी , असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे

जनसुरक्षा विधेयकाला सभागृहात आक्रमकपणे विरोध झाला नाही याबद्दल खेद व्यक्त करून ते म्हणाले , लोकांनी समाज माध्यमांवर विरोध केल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मीडियासमोर येऊन बोलणे ही ‘ नौटंकी ‘ आहे . महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा म्हणजे ‘ अघोषित आणीबाणी ‘ आहे . या कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार आहे . इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या वेळी जी चूक केली , तीच गोष्ट भाजपने कायद्याच्या रूपात आणून अघोषित आणीबाणी लादली आहे . याविरोधात निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे , वंचित बहुजन आघाडीने जनसुरक्षा विधेयकाला यापूर्वीच विरोध दर्शवला होता आणि आता याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे . इतर राजकीय पक्षांनीही या लढ्यात सहभागी व्हावे , असेही आवाहन त्यांनी केले .

You Might Also Like

प्रभाग क्र ३ अनुसूचित जाती सर्वसाधारण गटा मधून आयु आशय हनमंत अहिवळे यांची राजे गटा कडुन प्रबळ दावेदारी!

फलटणला पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करा ; खासदार धैर्यशील मोहिते – पाटलांची मंत्री ज्योतिरादित्य शिंदेकडे केली मागणी

सप्टेंबर किंवा आँक्टोबर मधे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका

मंगळवार पेठेतील बौद्ध अनुयायी व जनतेतुन वाढता प्रतिसाद पहाता सौ अनिता प्रशांत काकडे यांनाच उमेदवारी मिळेल असेच सध्या तरी दिसते!

भारताला हवे आहेत ‘हे’ ३ आतंकवादी

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
राजकीय

पालखी मार्गाची दुर्दशा हे विद्यमान सत्ताधार्‍यांचे अपयश – प्रितसिंह खानविलकर

Prashant Ahiwale Prashant Ahiwale June 19, 2025
पुण्यात इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला ! 25 जण वाहून गेले ; सहा जणांचा मृत्यू !
समाजात ५० वर्षाहून अधिक काळ उन्हातान्हात अखंडित कष्ट करत राहणाऱ्या कामगाराना वंदन !श्रीमंत रामराजे ना निंबाळकर
माऊलींचे आळंदी येथून प्रस्थान झाले असले तरी सुद्धा फलटण शहरातील माऊलींची वाट अद्याप बिकटचमाऊलींचे आळंदी येथून प्रस्थान झाले असले तरी सुद्धा फलटण शहरातील माऊलींची वाट अद्याप बिकटच
माजी प्रांत सचिन ढोले यांची मुंबई उपनगराच्या अप्पर जिल्हाधिकारी पदी पदोन्नतीने नियुक्ती
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account