फलटण | जगात अनेक धर्म आहेत . त्या त्या धर्मामध्ये कर्म सिद्धांत वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला आहे . मात्र या सर्व धर्मापेक्षा भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत वेगळा आहे . तो वास्तववादी व विज्ञानवादी आहे असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे फलटण तालुका शाखेचे संघटक विजयकुमार जगताप यांनी केले . ते भारतीय बौध्द महासभे मार्फत आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेत सरडे याठिकाणी बोलत होते .
यावेळी बोलताना ते म्हणाले , माणूस जसे कर्म करतो तसेच त्याचेच फळ त्याला मिळते . सर्वांनी कुशल कर्म करावे . सर्वांप्रती मंगलभावना व्यक्तकरावी . भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदायी वातावरणा मध्ये Q वर्षावास प्रवचन मालिकेचे तिसरे पुष्प गुंफण्यात आले . मौजे सरडे या गावात राजगृह समता सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आणि बौद्ध उपासक आणि उपासिका यांच्या उपस्थितीमध्ये धम्म उपदेश देण्यात आला . भारतीय बौद्ध महासभा शाखाफलटण तालुक्याचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय सातारा व पुणे जिल्ह्याचे प्रभारी व केंद्रीय असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले हे उपस्थित होते . तसेच फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव , कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे , समता सैनिक दलाचे उपाध्यक्ष संपत भोसले , प्रचार आणि पर्यटन NEW विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे सर कार्य . सचिव चंद्रकांत मोहितेतसेच भारतीय बौद्ध महासभे प्रवचनकार सोमिनाथ घोरपडे हे सर्व पदाधिकारी , ग्रामस्थ , बौध्द उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . फलटण तालुक्यात जोरदार वर्षावास प्रवचन मालिका चालू आहे . यावेळी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेचे महासचिव बाबासाहेब जगताप यांनी वर्षावास म्हणजे काय ? तो केव्हापासून सुरु झालाकाळातील उपासक व उपासिका यांनी कसे आचरण करावे . त्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले . त्यांनी वर्षावास आषाढ पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत का साजरा केला जातो याविषयी मांडणी केलीयावेळी सर्व उपस्थितांना भारतीय बौध्द महासभा फलटण तालुक्याच्या वतीने संविधान प्रस्ताविका प्रत देण्यात आल्या . तत्पूर्वी सर्वांकडून प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आलेयावेळी भारतीय बौध्द महासभा शाखा फलटण तालुक्यातील उपासक उपासिका यांच्या सभासद नोंदणी कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली .



