By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: सातारा नगरीला 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद जिल्हावासियांसाठी अभिमानास्पद : रविंद्र बेडकिहाळ
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > सामाजिक > सातारा नगरीला 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद जिल्हावासियांसाठी अभिमानास्पद : रविंद्र बेडकिहाळ
सामाजिक

सातारा नगरीला 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद जिल्हावासियांसाठी अभिमानास्पद : रविंद्र बेडकिहाळ

Prashant Ahiwale
Last updated: June 8, 2025 7:46 pm
Prashant Ahiwale Published June 8, 2025
Share
SHARE

मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेचा मान राखणारे आगामी 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा नगरीत होणार असून साहित्य क्षेत्रातील ही अत्यंत प्रतिष्ठेची घटना असल्याने संपूर्ण जिल्ह्यासाठी ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे ” , अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे फलटण शाखा अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केली

अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एकमताने आगामी साहित्य संमेलनासाठी सातारा शहराची निवड केली आहे . ऐतिहासिक वारसा , सांस्कृतिक वैभव आणि साहित्यिक चळवळीचा मजबूत पाया या कारणांनी साताऱ्याची निवड करण्यात आली आहे . राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना . छत्रपती श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या प्रयत्नांमुळे हा बहुमान सातारा नगरीला मिळाला आहे . महाराष्ट्र साहित्य परिषद शाहुपूरी शाखा व मावळा फौंडेशन यांच्या माध्यमातून हे भव्यदिव्य साहित्य संमेलन संपन्न होणार आहे ” , असे सांगून याबद्दल ना . श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व विनोद कुलकर्णी यांचे सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांच्या व म.सा.प. फलटण शाखेच्या पदाधिकारी व सहकाऱ्यांच्यावतीने रविंद्र बेडकिहाळ यांनी विशेष अभिनंदन केले आहे

सन 1962 , सन 1965 आणि सन 1993 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे संपन्न झाले होते . आगामी संमेलनात राज्यभरातील नामवंत साहित्यिक , कवी , लेखक , समीक्षक तसेच साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होतील . विविध परिसंवाद , कविसंमेलने , पुस्तक प्रदर्शन , ग्रंथदिंडी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होईल , यामुळे सातारा शहराचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधिक अधोरेखित होणार आहे . आता या ऐतिहासिक संमेलनाचे अध्यक्षपद कोण भूषवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

You Might Also Like

जेष्ठ पत्रकार प्रा . रमेश आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे बुधवार दि . २३ जुलै रोजी फलटण येथे आयोजन

संविधान कलम २१अ आमचा हक्काचे ..सनी घनश्याम काकडे

समाजात ५० वर्षाहून अधिक काळ उन्हातान्हात अखंडित कष्ट करत राहणाऱ्या कामगाराना वंदन !श्रीमंत रामराजे ना निंबाळकर

बहुजन चळवळीचा आश्वासक चेहरा काळाच्या पडद्याआड !

ताथवडा येथे झाले देशी झाडांचे वृक्षारोपण..

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
राजकीय

माळेगावसाठी फलटणच्या राजे गटाचा अजितदादांना पाठिंबा ; श्रीमंत संजीवराजेंनी जाहीर केला पाठिंबा

Prashant Ahiwale Prashant Ahiwale June 20, 2025
दि हॉकी सातारा संघटनेच्या कु. अनुष्का केंजळे व कु .तेजस्विनी कर्वे या दोन खेळाडूंची महाराष्ट्र हॉकी संघात निवड*
बिहार मधील संघ्यस्थिती
मी हार मानणार नाही- आ . रामराजे ना . निंबाळकर
नगराध्यक्षपदासाठी राजे गटाकडून अनिकेतराजेंचे नाव निश्चित ?
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account