By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांना दिला गंभीर ईशारा !!
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > राजकीय > जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांना दिला गंभीर ईशारा !!
राजकीय

जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांना दिला गंभीर ईशारा !!

Prashant Ahiwale
Last updated: December 24, 2025 9:56 pm
Prashant Ahiwale Published December 24, 2025
Share
SHARE

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही , त्यांची ताकद नसल्यामुळे नाइलाजाने एकत्र आले आहेत , अशी टीका भाजपचे नेते करत आहेत . उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांना एकत्र येण्याचा अधिकार आहेच , पण तरीही त्यामुळे अमित साटम , राम कदम वगैरेंची मळमळ बुलेट ट्रेनच्या वेगाने बाहेर येऊ लागली आहे . दोन भावांमध्ये काड्या करण्याचा त्यांचा लघुउद्योग अद्यापही थांबलेला नाही ! परंतु भाजपाला येथे एका गोष्टीची आठवण करून द्यावी लागेल . 1985 सालच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसने 161 जागा जिंकल्या , तर पुरोगामी लोकशाही दल किंवा पुलोद या आघाडीचे 104 आमदार निवडून आले होते . त्यामध्ये शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसचे 55 , जनता पक्षाचे 20 , – भाजपचे 16 आणि शेकापचे 13 आमदार होते . अपक्षांना 36 जागा मिळाल्या होत्या . शरद पवारांना सतत लाखोली वाहणाऱ्या भाजपने पुलोद आघाडीमध्ये राहून तेव्हा ती निवडणूक का लढवली ? 1978 मध्ये पुलोद सरकारमध्ये जनसंघ होता . परंतु किमान 1980 मध्ये भाजपची रितसर स्थापना झाल्यानंतर तरी भाजपने स्वबळावर निवडणुका का लढवल्या नाहीत ?

1985 च्या निवडणुकीत शिवसेनेकडून मशाल चिन्हावर लढलेले छगन भुजबळ मुंबईतील माझगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते . या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंनी शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता . त्यामुळे उद्धव ठाकरे जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले , तेव्हा त्यांनी बाळासाहेबांची तत्त्वे झुगारून दिली , असे कसे म्हणता येईल ? खुद्द बाळासाहेबांनीच पवारांशी तेव्हा दोस्ती केली होती . आणि उद्धव ठाकरेंना याबद्दल दूषणे देणाऱ्या भाजपने देखील तेव्हा पवारांचीच साथ केली होती . शिवाय शेवटी शरद पवार हे मूळ काँग्रेसवालेच . नेहरू – गांधी यांच्या काँग्रेस विचारांनाच मी मानतो , असे शरद पवार नेहमीच म्हणत होते व आहेत . म्हणजे आपण काँग्रेस विचार मानणाऱ्या पवारांशी साथ केली तर ते पुण्य , परंतु उद्धव ठाकरेंनी तसे केले , तर मात्र ते पाप , अशी भाजपची ही लबाडीचीदुहेरी निती आहे . भाजपने अन्य कोणाशीही युती केली , अगदी पवारांशी , तरी ते योग्य , परंतु उद्धव आणि राज एकत्र आले , तर ते मात्र चूक कसे ? आपल्या बरोबर असल्यास , तेव्हा त्या पक्षाला गृहीत धरायचे आणि तो विरोधात गेला की तो पक्ष ‘ राष्ट्रद्रोही , जनताद्रोही ‘ अशी बोंब ठोकायची , ही भाजपची रीत आहे . आपल्या विरोधात कोणी गेले की ते मात्र स्वार्थी राजकारण , असा भाजपचा कांगावा असतो ! भारतीय जनता पक्ष आणि त्या पक्षाच्या सुरात सूर मिसळणारी एकनाथ शिंदे यांची ‘ कोरस सेना ‘ यांची ठाकरे बंधूंवरील टीका , ही मतलबी स्वरुपाचीच आहे . लोकसभेच्या वेळी भाजपला मनसेचा उपयोग झाला . पण ‘ मतलब निकल गया है तो , पहचानते नहीं , यूँ जा रहे है , जैसे हमें जानते नहीं , हीच भाजपची नीती आहे . 2029 मध्ये ” अजितदादा यांचा ‘ सिंचन गट ‘ आणि शिंदे यांचा समृद्ध ‘ गट यांनादेखील हाच अनुभव येणार आहे

You Might Also Like

पहलगाम दहशतवादी हल्ला : सरकारने घेतलेल्या निर्णयांना सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला ; आता निर्णयांची प्रतिक्षा- शरद पवार —

केवळ आर्थिक लाभासाठी निवडणुकीपुरते उगविणारे अवकाळी नेते जनता अडचणीत असताना गायब

भारताला हवे आहेत ‘हे’ ३ आतंकवादी

सचिन कांबळे हे दलितांचे आमदार दलीत लोकांना न्याय देणार का ?

प्रभाग क्र अनुसूचित जाती सर्वसामान्य गटातुन आयु आशय हनमंत अहिवळे यांची राजे गटा कडून दावेदारी!

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
राजकीय

गर्व से कहो हम हिंदू है

Prashant Ahiwale Prashant Ahiwale April 9, 2025
मा केंद्रीय मंत्री ना रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली ३ नोव्हेंबर रोजी आर पी आय (आठवले) गटाचा वर्धापन दिन महाड येथे संपन्न होणार!
मंगळवार पेठेतील बौद्ध अनुयायी व जनतेतुन वाढता प्रतिसाद पहाता सौ अनिता प्रशांत काकडे यांनाच उमेदवारी मिळेल असेच सध्या तरी दिसते!
अतिवृष्टीमुळे श्रीमंत संजीवराजेंचा 61 वा वाढदिवस सोहळा पुढे ढकलला – मा . माजी आमदार दीपक चव्हाण
फलटण रनर्स फाऊंडेशन व नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी , फलटण यांच्या पुढाकारातून भव्य स्वच्छता उपक्रम
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account