By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: सातारा जिल्ह्याला चार मंत्री पण एकाची पण होईना फलटण मध्ये एन्ट्री
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > राजकीय > सातारा जिल्ह्याला चार मंत्री पण एकाची पण होईना फलटण मध्ये एन्ट्री
राजकीय

सातारा जिल्ह्याला चार मंत्री पण एकाची पण होईना फलटण मध्ये एन्ट्री

Prashant Ahiwale
Last updated: May 30, 2025 2:37 pm
Prashant Ahiwale Published May 30, 2025
Share
SHARE


फलटण – अतिवृष्टीमुळे फलटण तालुक्यात प्रचंड नुकसान होऊन पण एकाही मंत्र्याला पाहणीं दौरा करण्याची फुरसत मिळेनाशी झाली आहे.”सातारा जिल्ह्याला चार मंत्री पण एकाची पण होईना फलटण मध्ये एन्ट्री” अशी अवस्था असून अडचणीच्या काळात जिल्ह्यातील चारही मंत्र्यांनी पाठ फिरवल्याने तालुक्याचा अपमान झाल्याच्या भावना जनतेतून व्यक्त होत आहेत.
फलटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरात आणि शेतात अद्यापही पाणी असून अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत. फलटण तालुक्याची जी वार्षिक सरासरी आहे त्या सरासरीचा पाऊस तीन दिवसातच मे महिन्यात पडल्याने तालुक्यातील अनेक रस्ते, पूल वाहून गेले आहेत. शेती पिकाचे मोठे नुकसान झाले रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे.फलटण पूर्व भागात तर प्रचंड नुकसान झाले आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात प्रचंड अतिवृष्टी झाल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्र्यांनी येणे गरजेचे होते मात्र एकही मंत्री फिरकेनासा झाला आहे. कधी नव्हे एवढे चार मंत्री सातारा जिल्ह्याला यावेळी मिळालेले आहे त्यामुळे जिल्ह्याचा विकासाचा वारू प्रचंड वेगाने धावेल,अडचणीच्या वेळी मंत्री पाठीशी उभे राहतील असे लोकांना वाटत होते. मात्र अडचणीच्या काळात एकही मंत्री मदतीला धावेनासा झाला आहे.
सातारा जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री म्हणून जयकुमार गोरे आणि मदत पुनर्वसन मंत्री म्हणून मकरंद पाटील ही चार मंत्रिपद आहेत. चारही मंत्रीपदे तोला मोलाची आणि महत्त्वाची आहेत आणि जनतेशी निगडित आहेत.मात्र मोठे नुकसान होऊन चार दिवस उलटून सुद्धा या चार पैकी एकाही मंत्र्याला दौरा करण्याची गरज भासलेली नाही. चारही मंत्र्यांनी खरे तर तातडीने येणे गरजेचे होते.नाही त्या वेळेस फिरकतात गरजेच्या वेळेस येत नाहीत अशी स्थिती आहे. अडचणीच्या काळात त्यांनी पाठ फिरवून फलटण तालुक्यातील जनतेचा घोर अपमान केला आहे अशा प्रतिक्रिया आता जनतेतून उमटत आहेत.
दुसरीकडे मंत्र्यांवर विसंबून न राहता फलटण तालुक्यातील सर्व गटाच्या नेते मंडळींनी आपापल्या कार्यकर्त्यांसहित आपतग्रस्त जनतेला दिलासा देण्याचे चांगले काम केले आहे. प्रत्येक गावापर्यंत जाण्याचा प्रयत्न नेतेमंडळी करीत आहेत व आपापल्या परीने मदत सुद्धा करत आहे. तालुक्यातील नेतेमंडळींबद्दल जनतेतून चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहेत या नेते मंडळींना मंत्र्यांनी साथ देणे गरजेचे होते मात्र मंत्र्यांनी पाठ फिरवल्याने जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.

You Might Also Like

श्रीमंत संजीवराजे व युवराज अनिकेतराजेंनी केली पुरग्रस्तांची पाहणी

mpscच्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांचा पुढाकार थेट अध्यक्ष रजनीश सेठ यांना फोन

जिल्हा परिषद व नगरपरिषदेच्या निवडणूका ताकदीने लढवा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

रेशनदुकानदारांना अजित पवारांकडून गिफ्ट, कमिशनमध्ये घसघशीत वाढ; मंत्रालयातील बैठकीत निर्णय

मंगळवार पेठेतील बौद्ध अनुयायी व जनतेतुन वाढता प्रतिसाद पहाता सौ अनिता प्रशांत काकडे यांनाच उमेदवारी मिळेल असेच सध्या तरी दिसते!

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
सामाजिक

सातबारा खरा की बोगस? या 3 गोष्टी तपासल्या शिवाय कोणताच व्यवहार करू नका!

Prashant Ahiwale Prashant Ahiwale June 24, 2025
श्रीमंत रामराजेंच्या हस्ते महिंद्रा लॉजिस्टिक्सचे वेअरहाऊसिंगचे उद्घाटन ; ३ लाखचौरस फूटांहून अधिकचा स्पेस , शेकडो युवकांना रोजगार उपलब्ध
इतिहासात नोंद आहे शिवाजी महाराज लालन पालन लाल महालात झाले शहाजी भोसले यांनी पुण्याच्या झांबरे पाटील यांच्याकडून जागा विकत घेऊन लाल महल बांधला पण तो लालमहाल पेशव्यांनी शनिवार वाडा आहे असं करून तो लाल महाल गायब करून टाकला आणि शनिवार वाड्या शेजारी 1980 मध्ये म्हणजेच भारत स्वतंत्र झाल्यावर लाल महल बांधला ज्या लाल महालामध्ये शाहिस्तेखानाचे एक लाख सैन्य घेऊन रात्रीचा मुक्कामी राहिला होता त्या रात्री शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाचे तीन बोटे तलवारीने तोडले होते. पुण्यामध्ये असे एकमेव ठिकाण आहे की जेथे शाहिस्तेखान एक लाख सैन्य घेऊन मुक्कामी राहिलेला होता म्हणजेच तो लाल महाल पेशवे आल्यानंतर त्याची रूपांतर शनिवार वाड्यात केली आहे यासाठी सविस्तर वाचा इतिहास संशोधक इतिहासकार प्राध्यापक मा .म. देशमुख यांचा शनिवार वाडा बाकी आहे हे पुस्तक पूर्ण पुराव्यासहित
गोखळी येथील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र भागवत यांचे अपघाती निधन ; परिसरात शोककळा
थेट सरपंच पदाची आरक्षण सोडत २४ एप्रिल रोजी होणार तहसीलदार डॉ अभिजात जाधव
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account