By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: वाठार हायस्कूल वाठार निंबाळकर SSC मार्च 2007 बॅच मधील सर्व माजी विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या ७ ९ व्या वर्धापन दिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२५ रोजी एक उपक्रम आयोजित
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > सामाजिक > वाठार हायस्कूल वाठार निंबाळकर SSC मार्च 2007 बॅच मधील सर्व माजी विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या ७ ९ व्या वर्धापन दिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२५ रोजी एक उपक्रम आयोजित
सामाजिक

वाठार हायस्कूल वाठार निंबाळकर SSC मार्च 2007 बॅच मधील सर्व माजी विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या ७ ९ व्या वर्धापन दिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२५ रोजी एक उपक्रम आयोजित

Prashant Ahiwale
Last updated: August 16, 2025 12:47 pm
Prashant Ahiwale Published August 16, 2025
Share
SHARE

वाठार हायस्कूल वाठार निं. या ठिकाणी S.S.C.बॅच 2006-2007 माजी विद्यार्थी यांचा स्नेहमेळावा दिमखात संपन्न

वाठार नि.-वाठार हायस्कूल वाठार निं. येथे S.S.C.बॅच 2006-2007 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा (गेट टुगेदर) संपन्न झाला.

गेल्या 19 वर्षापासून भेटीसाठी शिक्षक विद्यार्थी आतूर झाले होते. या विद्यार्थी यांना वर्ग शिक्षक लाभलेले गुरुवर्य, तसेच वर्गशिक्षक मा . शारदा देवी कदम मॅडम यांनी मार्गदर्शन त्या वेळी केले.

याच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संस्काराने घडलेली ही पिढी एका विचाराने एकत्र आली. शाळेत खेळलो, बागडलो, ज्ञान घेतले त्याच शाळेत जुन्या आठवणीना उजाळा मोठ्या उत्साहात मध्ये साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाला उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग सर्व माझी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमाला एक वेगळे रूप आले आणि सर्वांच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. 19 वर्षापूर्वीची परिस्थिती ही फार वेगळी होती व आता प्रौढ स्थितीतील ही वेगळी आहे. या आगोदर विद्यार्थी म्हणून होतो. व आता 19 वर्षानंतर माझी विद्यार्थी म्हणून एकत्र वेगळेच रूप पाहायला मिळाले, या वेळी काही शिक्षक मंडळींनी ही आपली या बॅचच्या संदर्भातील मनोगत व्यक्त केले. या गेट-टुगेदर च्या कार्यक्रमामुळे आपण कुठे आहे आणि आपले मित्र मैत्रिणी कुठे आहेत, कोणत्या पदावर ते काम करत आहेत, हे एकमेकांना अवगत झाले, हा कार्यक्रम काही तासात च संपेल असे वाटले पण जुन्या आठवणी मनामध्ये निर्माण जाग्या झाल्या या गेट-टुगेदर च्या कार्यक्रमासाठी सर्वांना एकत्रित आणण्याचे काम ते म्हणजे –

सागर मोहिते, निलेश निंबाळकर, सागर घोलप, अनिल जगताप, अमोल माने, अविनाश ननावरे, किशोरी पवार, प्रकाश म्हेत्रे, तोसिफ शेख, स्वप्नाली निंबाळकर, अनुजा मुळीक, स्वप्नील मुळीक, गणेश धायगुडे.

मुख्याध्यापक मा श्रीमंत घोरपडे सर तसेच, शिवाजी शिंदे सर, जाधव सर, मोटे मॅडम तसेच सोनवलकर मामा आणि हंबीरराव मोहिते मामा या सर्वांनी मनोगत वेक्त केले.

कार्यक्रमाचे व्यासपीठ सांभाळण्याची काम केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश निंबाळकर यांनी केले नंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीचे संस्थाध्यक्ष मा श्री . सह्याद्रीभैय्या चिमणराव कदम तसेच वाठार निंबाळकर गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच मा सौ. सुवर्णताई नंदकुमार नाळे उपस्थित होते.

गेट-टुगेदर चा कार्यक्रमात उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. भोजनाचा आस्वाद सर्वांनी मिळून घेतला आणि या कार्यक्रमाची सांगता केली.

या कार्यक्रमात सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून देऊन मनोगत व्यक्त केली आपली कौटुंबिक प्रगती आणि मुलांनी सध्या कार्यरत असलेल्या पदाचा परिचय दिला
आपली कौटुंबिक प्रगती आणि मुलाना केलेले शैक्षणिक कार्यात केलेली उच्च प्रगती यावर ही बोलण्यात आले. शाळेमध्ये घडलेल्या विद्यार्थ्यांच्या शेतात अनुभवांचा महापौर करून एकच हास्य कलमाला मनोगत व्यक्त केली व्यापार, व्यवसाइक, नोकरदार यांनी आपण गाठलेल्या टप्प्यावर अनुभव व्यक्त केले. कार्यक्रमात माजी विद्यार्थी कडून शाळेला आणि हसत खेळत विज्ञान तसेच एआई टेक्नॉलॉजी द्वारे सर्व शाळेतील मुलांना vertual session ठेवला तसेच शाळेला छोटी भेट वस्तु दिली.कार्यक्रमाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.

वाठार हायस्कूल वाठार निंबाळकर SSC मार्च 2007 बॅच मधील सर्व माजी विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२५ रोजी एक उपक्रम आयोजित केला.

एक प्रयत्न सामाजिक बांधिलकी जपण्याचा

ज्या समाजात आपण जीवन जगतो त्या समाजाबद्दल ऋण व्यक्त करणे आपले सामाजिक कर्तव्य आहे. या तत्वाला अनुसरून SSC मार्च 2007 बॅच मधील सर्व विद्यार्थी भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२५ रोजी एक उपक्रम आयोजित केला
.
एक प्रयत्न सामाजिक बांधिलकी जपण्याचा

या उपक्रमाला अनुसरून दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी आपल्या SSC मार्च 2007 विद्यार्थी मार्फत सर्व प्रथम सकाळी 7.30 वाजता असाहाय्यांसाठी सहाय्याचा लढा या उक्तीप्रमाणे आई अनाथ आश्रम मलठण फलटण येथील मातृ पितृ समान वृद्धांना फळ वाटप ( सफरचंद व केळी ) केली .

त्या नंतर ओमकार वृद्धाश्रम कुरवली खुर्द येथील वृद्धांसाठी देखील फळ (केळी व सफरचंद ) वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला.

दोन्ही ठिकाणी कार्यक्रम संपन्न करून आपल्यासर्व प्रतिनिधी टीम सकाळी ठीक ९.३० वाजता ज्या ठिकाणी आपण आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. अशा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली जिल्हा परिषद शाळा वाठार निंबाळकर, जिल्हा परिषद शाळा जुनागाव, वाठार हायस्कूल वाठार निंबाळकर या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले .

या ठिकाणी आपल्या SSC मार्च 2007 बॅचमार्फत सर्व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला .

या मध्ये

१ ली ते ४ थी – स्केच पेन किट

५ वी ते ७ वी – नटराज किट (पेन्सिल, स्केल, इरेझर,शार्पनर,)

८ वी ते १० वी – कंपास किट

इत्यादी एकूण २५० विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला .

या अविस्मरणीय कार्यक्रमासाठी SSC मार्च 2007 बॅच मधील सर्व विद्यार्थ्यांनी केलेल्या आर्थिक मदतीचा हातभार लागला .

आपल्या एकीची ताकद यापुढे देखील कायम अशीच राहू द्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


आयोजक- SSC मार्च 2007

You Might Also Like

जेष्ठ पत्रकार प्रा . रमेश आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे बुधवार दि . २३ जुलै रोजी फलटण येथे आयोजन

सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे काम कौतुकास्पद – श्रीमंत विश्वजितराजे ना . निंबाळकर

संविधानीक आरक्षणची का जरूरी आहे?

आंबेडकरी अनुयायी व निळा टोपीतील भिम सैनिक खंडु क्रष्णा रणदिवे अनंतात विलीन

प्राचार्य विश्वासराव देशमुख शतायुषी व्हा!

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
फलटण

☝️प्रबुद्ध व भीमजयंती समितीने आंबेडकरी प्रजा परिषदेच्या स्मृती जाग्रुत ठेवल्या☝️

Prashant Ahiwale Prashant Ahiwale April 25, 2025
भारतीय संविधान कलम 21 अ व कोचिंग सेंटर बोर्ड नियमावली भंग करणाऱ्या शाळेनावर कार्यवाही करण्यात यावी…कामगार संघर्ष संघटणा
टिफिन मध्ये नाँन व्हेज नेल म्हणुन शाळेने केली हक्कल पट्टी
फलटण – येथील प्रसिद्ध व्यापारी दत्तात्रय विठ्ठल भांबुरे यांच्या पत्नी सौ ज्योती भांबुरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले
सप्टेंबर किंवा आँक्टोबर मधे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account