By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: पालखी मार्गाची दुर्दशा हे विद्यमान सत्ताधार्‍यांचे अपयश – प्रितसिंह खानविलकर
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > राजकीय > पालखी मार्गाची दुर्दशा हे विद्यमान सत्ताधार्‍यांचे अपयश – प्रितसिंह खानविलकर
राजकीय

पालखी मार्गाची दुर्दशा हे विद्यमान सत्ताधार्‍यांचे अपयश – प्रितसिंह खानविलकर

Prashant Ahiwale
Last updated: June 19, 2025 10:37 pm
Prashant Ahiwale Published June 19, 2025
Share
SHARE

फलटण – ‘‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील पालखी मार्ग आत्ताच्या घडीला पुर्णावस्थेत हवा होता. मात्र तसे न घडता या मार्गाची अत्यंत दुर्दशा झाली असून यामुळे शहरवासियांच्यात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. विद्यमान सत्ताधार्‍यांचे हे भले मोठे अपयश आहे’’; अशी टिका राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी केली आहे. 

याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात प्रितसिंह खानविलकर यांनी नमूद केले आहे की, ‘‘विद्यमान सत्ताधार्‍यांनी शहरातील पालखी मार्ग सिमेंट काँक्रीटचा होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर फलटणकरांमध्ये आशादायी वातावरण निर्माण झाले होते. सुमारे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस या कामाला सुरुवात झाली. मात्र 5 महिने उलटून आता पालखीचे आगमन फक्त 10 दिवसांवर आले असतानाही ही कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. यामुळे फलटणकरांमधून प्रचंड नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.’’ 

‘‘संबंधित कामाच्या कंत्राटदाराने आधी मलठणमधले रस्ते खोदले, त्यानंतर विमानतळा नजिकचा रस्ता खोदला. खोदकाम केलेल्या ठिकाणचे संपूर्ण काम करायचे सोडून पुन्हा गिरवी नाका, कामगार वसाहत, महात्मा फुले चौक या ठिकाणचे रस्ते खोदण्यात आले. कामातील चूकीचे नियोजन आणि सत्ताधार्‍यांचे दुर्लक्ष यामुळे खोदलेला कोणताही रस्ता अद्याप पुर्ण झालेला नाही. पालखीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील अन्य ठिकाणचेही पॅचवर्क होणे अपेक्षित होते; तेही अद्याप झालेले नाही. यातून सत्ताधारी व प्रशासन यांची उदासिनता दिसून येत असून वारकर्‍यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.’’, असे नमूद करुन ‘‘यापूर्वी असे ढिसाळ नियोजन फलटणकरांना पहायला मिळाले नव्हते’’, असा खोचक टोलाही प्रितसिंह खानविलकर यांनी सत्ताधार्‍यांना उद्देशून लगावला आहे.

You Might Also Like

धैर्यशील मोहिते पाटील यांची मा . नगरसेवक सनी अहिवळे यांच्या निवासस्थानी भेट

वक्फ बोर्डाच्या जागेच्या नियंत्रणासाठी नवीन विधेयक मात्र स्वतःच्या जागेच काय..? – जांबुवंत मनोहर यांचा सवाल  

विहीर योजनेतील मोठा बदल… आता

खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते फलटण येथे बांधकाम कामगारांना भांडी सेटचे वाटप.

सप्टेंबर किंवा आँक्टोबर मधे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
राजकीय

श्रीकांत बापु सुळ यांची वडजल ग्रामपंचायत पदी बिनविरोध उपसरपंच म्हणून निवड !

Prashant Ahiwale Prashant Ahiwale April 12, 2025
साखरवाडी व खामगाव परिसरामध्ये अवैध धंदे जोमात पोलीस प्रशासन कोमात
ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता व सौ इंदुमती मेहता यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नागरी सत्काराचे आयोजन
फलटण मधील सर्व महापुरुषांची निस्वार्थ पने सेवा करणारे बंडू अहिवळे
गोळेवाडी येथे विषारी मण्यार सापाच्या दुर्मीळ शिकारीचे दर्शन ; NWWS , फलटण संस्थेने ही घटना केली कॅमेरा मध्ये कैद
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account