फलटण — फलटण शहरात मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री आणि मोकाट जनावरे वाढली आहेत. याचा त्रास नागरिकांना होत असल्याने भटकी कुत्री व बेवारस गुरांचा तातडीने बंदोबस्त नगर पालिकेने करावा अशी मागणी माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
फलटण शहरात भटकी कुत्री व बेवारस जनावरे यांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसत असून त्याचा सर्व सामान्य नागरिकांना व विशेषता लहान मुलांना फार त्रास होत आहे. शहरातील चौका चौकात 10ते 15 कुत्र्यांचे टोळके व भर रहदारीचे चौकात बेवारस जनावरांचे कळप बसलेले असतात त्यांचा वाहन चालकाना खूप त्रास होत आहे आता तर ही जनावरे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकावर हल्ला करू लागले आहेत त्या मुळे एखाद्या नागरिकाचे जीवास धोका होऊ शकतो
नागरिकाचा किंवा एखादे लहान मुलांचा जीव गेल्या वर नगर पालिका या प्रश्नाकडे लक्ष देणार आहे काय असा सवाल प्रशासनाला माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी विचारला आहे.
या प्रश्नाचा नगर पालिकेने ताबडतोब आठ दिवसाचे आत बंदोबस्त करावा अन्यथा भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना व मित्र पक्ष या महायुतीचे मार्फत नगर परिषदे समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा अशोकराव जाधव यांनी दिला आहे