By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: अवघ्या 3 दिवसात 4 जवानांना वीरगती ; महाराष्ट्रावर शोककळा , रामराजे निंबाळकरांकडून श्रद्धांजली
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > सातारा जिल्हा > फलटण > अवघ्या 3 दिवसात 4 जवानांना वीरगती ; महाराष्ट्रावर शोककळा , रामराजे निंबाळकरांकडून श्रद्धांजली
फलटण

अवघ्या 3 दिवसात 4 जवानांना वीरगती ; महाराष्ट्रावर शोककळा , रामराजे निंबाळकरांकडून श्रद्धांजली

Prashant Ahiwale
Last updated: January 14, 2026 6:19 pm
Prashant Ahiwale Published January 14, 2026
Share
SHARE

महाराष्ट्राचे ४ वाघ काळाच्या पडद्याआड गेल्या तीन दिवसांत भारतीय सैन्यातील महाराष्ट्राच्या चार जवानांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे . या दुर्दैवी घटनांनी संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे : जवान वैभव श्रीकृष्ण लहाने ( अकोला ) : काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीरगती . नायक विलास विठ्ठल गावडे ( बरड , फलटण ) : दक्षिण आफ्रिका शांतता मोहिमेवर असताना शहीद . जवान अभिजीत माने ( भोसे , कोरेगाव ) : दक्षिण आफ्रिका मोहिमेवर असतानाच वीरमरण . जवान प्रमोद परशुराम जाधव ( दरे , सातारा ) : नियतीचा क्रूर खेळ ; अवघ्या 8 तासांच्या तान्हुल्या बाळाला डोळे भरून पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप घेतला .उत्सव नाही , तर वीर जवानांना श्रद्धांजली ‘ रामराजे – श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर दरवर्षी मकर संक्रांतीनिमित्त लक्ष्मी विलास पॅलेस येथे तिळगुळ समारंभाचे मोठे आयोजन करतात . मात्र , आपल्याच मातीतील आणि जिल्ह्यातील तरुण जवान शहीद झाल्याने त्यांनी हा सोहळा न साजरा करण्याचा निर्णय घेतला . ” आपल्या जिल्ह्याने आणि राज्याने चार हिरे गमावले आहेत . या वीर जवानांच्या बलिदानापुढे कोणताही सण मोठा नाही . त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत , ” अशा भावना व्यक्त करत रामराजेंनी याजवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे . जिल्ह्यावर दुःखाचे सावट एकीकडे मकर संक्रांतीच्या सणाची तयारी सुरू असताना , सातारा जिल्ह्यातील तीन घरांचे आधारस्तंभ कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे . विशेषतः जवान प्रमोद जाधव यांच्या निधनाने जनमानस सुन्न झाले आहे . या वीर सुपुत्रांच्या सन्मानार्थ फलटणमधील तिळगुळाचा शासकीय व सामाजिक कार्यक्रम रद्द करून रामराजेंनी एक संवेदनशील आदर्श समोर ठेवला आहे .

You Might Also Like

वीज देयका ‘ स्मार्ट ‘ घोटाळा ?

श्रीमंत रामराजेंच्या हस्ते महिंद्रा लॉजिस्टिक्सचे वेअरहाऊसिंगचे उद्घाटन ; ३ लाखचौरस फूटांहून अधिकचा स्पेस , शेकडो युवकांना रोजगार उपलब्ध

समस्त जैन समाजाचा फलटण येथे मूक मोर्चा !

भुरटा गौरक्षकांच्या दहशतीमुळे हजार कोटींचा फटका?

खा.सुप्रियाताई सुळे यांचे रस्ता साठी उपोषण

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News

पालखी मार्गाची दुर्दशा हे विद्यमान सत्ताधार्‍यांचे अपयश – प्रितसिंह खानविलकर

Prashant Ahiwale Prashant Ahiwale June 19, 2025
श्रीमंत रामराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण नगरपरिषद निवडणूक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्यापासून सुरू , राजे गटाच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर
सौ . प्रीती संजय भोजने राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित
सर्वांनी छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसराचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी घ्यावी : श्रीमंत संजीवराजे
गुणवरे गावचे अमोल आढाव यांची फलटण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड .
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account