फलटण प्रतिनिधी- जम्मू- काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात अनेक नागरिक आणि पर्यटक जखमी झाले आहेत तसेच या हल्ल्यात काही निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले . विशेष करून नाव जात विचारून फक्त पुरुषांना टारगेट करून गोळ्या घालण्यात आल्या आहेत . ही बाब निश्चितच निंदनीय निषेधार्य असून या घटनेमुळे संपूर्ण भारत देशात दुःखाची आणि संतापाची लाट उसळली आहे . या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं आणि बंद पाळण्यात आले आहेत . याच पार्श्वभूमीवर फलटण मुस्लिम युवा
मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध मोर्चा मोर्चा काढून हल्ल्यात मूर्त पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे . तसेच देश विघातक करणाऱ्या कृत्य प्रवृत्तींचाही मुस्लिम बांधवांनी कायमच निषेध व्यक्त करून भारत देशाविषयी असणारे आपले प्रेम व राष्ट्रीय एकात्मता दाखवून दिली आहे
जातीय सलोखा बंध कायमच राखला गेला आहे . या निषेध मोर्चामध्ये प्रामुख्याने फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक आसिफ उर्फ बाळासाहेब मेटकरी , पैलवान पप्पूभाई शेख , पैलवान मेहबूब मेटकरी , जमशेदभाई पठाण , सामाजिक कार्यकर्ते रियाज इनामदार शाकीरभाई महात , सादिक भाई बागवान , पै . वसीम मणेर , निजामभाई आतार , इमरान कुरेशी , हैदर मेटकरी इत्यादी सामाजिक कार्यकर्तेसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . विशेष करून पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आपला जीव गमवावा लागला असून ते शहीद झाले आहेत , त्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात



