बारामती | भारताच्या संविधान निर्मितीचे काम 1946 मध्ये सुरु झाले असले तरी त्याची प्रक्रिया यापूर्वी 55 वर्षे सुरु होती , या काळात झालेल्या 12 प्रयत्नांपैकी 9 प्रयत्नांमध्ये डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा सहभाग होता . Q त्यामुळे ते खऱ्या अर्थाने भारतीय घटनेचे शिल्पकार ठरतात , असे प्रतिपादन प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि NEW सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ माजी कुलगुरू डॉ . नरेंद्र जाधव यांनी केले . ते बारामती येथे झालेल्या भिमपुत्र आँयडाँल 2025 च्या कार्यक्रमात बोलत होते
भीमपुत्र आयडॉल 2025 च्या कार्यक्रमाने बारामतीच्या शिरपेचात नवा मानाचा तुरा रोवला गेला आहे . समाजातील युवकांना प्रेरणा देण्याचा , त्यांच्या नेतृत्वगुणांना प्रोत्साहन देण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे . आपल्या मातीशी नाळ जोडलेले भुमीपुत्र आणि भीमपुत्रांना बदलत्या युगात नव्या मार्गदर्शनाची गरज आहे . अशा कार्यक्रमातून हे मार्गदर्शन होऊ शकते असे विचार या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहण्या
खासदार सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केले . संविधान केवळ कायदेशीर दस्तऐवज नाही तर आपल्या स्वप्नांचा , मुल्यांचा आणि आकांक्षांचा आरसा आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले .
दैनिक मुंबई येथील डॉ . कल्पना सरोज , Q देवांश धनगर , ठाण्याचे डॉ . मुरहरी केळे , लखनौचे राजेश चंद्रा , हैद्राबादचे शेख चांद पाशा , नांदेडचे बाबुराव केंद्रे , नळदुर्गचे मारुती बनसोडे , अहिल्यानगरचे शंकर अंदानी आणि सुमन धामणे , अकलूजच्या डॉ . स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील , जेजुरीचे पांडुरंग सोनवणे , बारामतीचे डॉ . रोहन अकोलकर यांना यावेळी सन्मानचिन्ह आणि संविधानाची प्रत देऊन गौरविण्यात आले
त्यांनी केलेल्या कामगिरीची माहिती देणारी चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली . येथील संविधान विचार मंचाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संविधान विचार मंचाचे अध्यक्ष राजेश कांबळे यांनी केले तर आभार सचिव घनश्याम केळकर यांनी मानले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनील सावळे पाटील यांनी केल



