फलटण तालुक्यामध्ये दिनांक 24 आणि 25 मे रोजी पडलेल्या अतिवृष्टीमुळे फलटण शहर आणि ग्रामीण भागामध्ये बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती . फलटण शहरातून वाहणाऱ्या बाणगंगा नदीला तसेच ग्रामीण भागातील अनेक ओढ्यानाल्यांना पूर आलेले होते . या आपत्तीत अडकलेल्या आपदग्रस्तांना दिलासा देण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले
खबरदारीचा उपाय म्हणून फलटण शहरातून शनी नगरभागातून सुमारे 40 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले . त्याशिवाय मौजे खुंटे येथील हनुमान नगर परिसरातून 28 कुटुंबे , मौजे हणमंतवाडी येथील 15 कुटुंबे , मौजे गोखळी पाटी येथील 12 कुटुंबे , मौजे मुरूम येथील 10 कुटुंबे , मौजे सरडे येथील 11 कुटुंबे यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते . मौजे सस्तेवाडी येथील एक कुटुंब पाण्याने वेढलेल्या अवस्थेत होते त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती सुरक्षा दल फलटण येथे दाखल झाले होते . तथापि दल दाखल होण्यापूर्वीच पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने सदर कुटुंब सुरक्षित बाहेर पडले . त्याशिवाय मौजे दुधेबावी आणि मौजे भाडळी खुर्द या दोन ओढ्याच्या मध्ये अडकलेल्या खाजगी वाहनातील परगावातील अंदाजे 50 व्यक्ती ( 15 महिला व 15 लहान मुले यांच्यासह ) यांची रात्री राहण्याची आणि जेवण्याची सोय प्रशासनातर्फे यांच्यातर्फे करण्यात आली . तसेच मौजे मिर्दे आणि मौजे जावली या दोन कोड्यांच्या मध्ये अडकलेल्या महाराष्ट्र राज्य
परिवहन महामार्गाच्या बसमधील सुमारे 64 प्रवाशांची रात्री राहण्याची आणि जेवण्याची सोय देखील प्रशासनातर्फे करण्यात आली



