By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: अखेर बच्चु भाऊंनी अन्नत्याग उपोषण आंदोलन मागे घेतले!
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > राजकीय > अखेर बच्चु भाऊंनी अन्नत्याग उपोषण आंदोलन मागे घेतले!
राजकीय

अखेर बच्चु भाऊंनी अन्नत्याग उपोषण आंदोलन मागे घेतले!

Prashant Ahiwale
Last updated: June 14, 2025 4:20 pm
Prashant Ahiwale Published June 14, 2025
Share
SHARE

अमरावती : 14 जुन 2025
प्रहार चे नेते माजी आ.बच्चू कडू यांनी मागील 7 दिवसापासून सुरू असलेले उपोषण अखेर स्थगित केले. 20 पेक्षा अधिक मागण्या मान्य झाल्याचे सांगत हा आंदोलनाचा सर्वांत मोठा विजय असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
शेतक-यांना कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ या प्रमुख दोन मागण्या घेऊन गेल्या 6 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अखेर आपलं उपोषण आज मागे घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कर्जमाफीबद्दल कधीच बोलत नव्हते. पण, आपल्या आंदोलनाने, उपोषणाने त्यांना यावर बोलायला भाग पाडले.
तसेच येत्या २ ऑक्टोबरपर्यंत सरकारने कर्जमाफीची तारीख सांगावी, नाहीतर गांधीजयंतीदिनी भगतसिंह शैलीत आंदोलन करून मंत्रालयात घुसू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. आपण आंदोलन थांबवत नाही तर पुढे ढकलतोय, असे बच्चू कडू यांनी आवर्जून अधोरेखित केले.
आज मंत्री उदय सामंत व आ.अमोल मिटकरी यांनी महायुती सरकारतर्फे मध्यस्थी करीत माजी आ. बच्चु कडु यांना लेखी आश्वासन देत बच्चु कडु यांचे आज सातव्या दिवशी उपोषण तोडले.
राज्य सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनात शेतकऱ्यांची कर्जमाफी, विविध प्रश्न, नुकसानभरपाई यांवर 15 दिवसात समिती गठित करुन समितीचा अहवाल आल्याबरोबर कैबिनेट बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली जाईल असेही सरकार तर्फे सांगण्यात आले आहे. यावेळी बच्चु कडु म्हणाले की आम्ही आंदोलन स्थगित केले आहे, थांबविले नाही. यानंतर आम्ही व आमच्या प्रहारचे कार्यकर्ते चार पट ऊर्जेने दिव्यांगांच्या मागण्यांसाठी सरकारवर
तुटुन पडु असा इशारा सुद्धा त्यांनी दिला

You Might Also Like

रिपाई ची राजकीय रणनीती संदर्भात शुक्रवार दिनांक 11 जुलै रोजी फलटण येथे बैठक : नगरपालिका , पंचायत समिती , जिल्हा परिषद या निवडणूकीची रणनीती ठरणार

सत्ताधारी पक्षाकडूनच फलटणमध्ये बॅनर बंदीचा भंग!

एका राजकीय पुढायाच्या मोठ्या कंपनीचे लेटर दाखवून वेगवेगळ्या बड्या अधिकाऱ्यांनंतर छत्तीसगडच्या उद्योजकाला घातला कोटींचा गंडा बारामतीच्या लखोबा लोखंडेचे अनेक प्रताप उघड

भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीपकुमार जाधव यांचा भाजपला रामराम

गुजरात काँग्रेस कमिटीची बैठक

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
क्राईम

लोणंद अपघातात दचाकीस्वार ठार

Prashant Ahiwale Prashant Ahiwale May 14, 2025
साताऱ्यात होणार १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन
माता रमाई फूड्स प्राँडक्ट्स घेऊन येत आहे दिपावली फराळ धमाका बंपर धमाका आँफर !
गोविंद मिल्क चा ३० वा वर्धापनदिन सोहळा मा . आमदार श्रीमंत रामराजे नाईक – निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न
नीरा देवधरच्या लाभक्षेत्रात असणाऱ्यांनाच हक्काचे पाणी मिळाले पाहिजे : श्रीमंत संजीवराजे ना निंबाळकर
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account