By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: हैदराबाद गॅझेटला मान्यता , मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला ? राज्यपालांच्या सहीनं GR काढणार
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > राजकीय > हैदराबाद गॅझेटला मान्यता , मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला ? राज्यपालांच्या सहीनं GR काढणार
राजकीय

हैदराबाद गॅझेटला मान्यता , मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला ? राज्यपालांच्या सहीनं GR काढणार

Prashant Ahiwale
Last updated: September 2, 2025 8:06 pm
Prashant Ahiwale Published September 2, 2025
Share
SHARE

मुंबई :-मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे . राज्य मंत्रीमंडळाच्या उपसमितीने हैदराबाद गॅझेटला मान्यता दिली असून , लवकरच राज्यपालांच्या सहीनंतर शासन निर्णय ( GR ) जाहीर होणार आहे . मराठा समाजाच्या मागण्यांना बळ देणारा हा निर्णय ऐतिहासिक ठरू शकतो . उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील , जयकुमार गोरे , शिवेंद्रराजे भोसले आणि ॥ माणिकराव कोकाटे यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन नवीन मसुदा सादर केला आणि शासनाच्या योजनांबाबत सविस्तर माहिती दिली

मनोज जरांगे यांचे स्वागत , पण अपेक्षा कायम मनोज जरांगे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे . ” हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी ही मराठा समाजाची जुनी मागणी होती . आता ती पूर्ण होत आहे , ” असे त्यांनी सांगितले . शासन निर्णयानुसार , मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी स्थानिक पातळीवर चौकशी केली जाणार आहे . यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो . तसेच , सातारा गॅझेटचा अभ्यास करून त्याचीही अंमलबजावणी होणार आहे . जरांगे यांनी सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिला असून , प्रक्रिया किचकट असल्याचे उपसमितीने नमूद केले आहे .

आंदोलकांवरील खटले मागे , बलिदान दिलेल्या कुटुंबांना मदत , नोकरी । ।। मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले बहुतांश खटले मागे घेण्यात आले असून , उर्वरित खटले न्यायालयातून मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे . याबाबतही शासन निर्णय लवकरच निघणार आहे . तसेच , आंदोलनात बलिदान देणाऱ्या मराठा बांधवांच्या कुटुंबांना १५ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे . ही मदत एका आठवड्यात वितरित होईल . याशिवाय , शैक्षणिक पात्रतेनुसार बलिदान देण्याऱ्या कुटुंबातील सदस्यांना राज्य परिवहन मंडळ , संस्थांमध्ये नोकऱ्या देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे . मात्र , जरांगे यांनी सुचवले की , उच्च शिक्षित तरुणांना चांगल्या संधी उपलब्धकरून द्याव्यात . एमआयडीसी आणि महावितरणसारख्या सरकारी संस्थांमध्यो नोकरी द्यावी , कारण अनेक विधवा महिला देखील आहेत

वंशावळ समिती आणि नोंदींची प्रक्रिया मराठा समाजाच्या ५८ लाख नोंदींचे रेकॉर्ड शासनाकडे आहे . ग्रामपंचायतींमधील नोंदींचा उपयोग करून लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया गतिमान करण्याची विनंती जरांगे यांनी केली आहे . तालुका स्तरावर वंशावळ समिती स्थापन करून शिंदे समितीला स्वतंत्र कार्यालय आणि न्यायिक || अधिकार देण्याची मागणीही त्यांनी केली . सगे- सोयरे संदर्भात आलेल्या ८ लाख हरकतींमुळे प्रक्रियेला वेळ लागत असल्याचे उपसमितीने स्पष्ट केले आहे .

मराठा – कुणबी एकच , पण प्रक्रियेला वेळ लागणार “ मराठा आणि कुणबी एकच आहेत , ” असे सांगत जरांगे यांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी केली आहे . मात्र , सरकारने यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला आहे . याबाबत जरांगे यांनी दोन महिन्यांचा अवधी दिला आहे . शिंदे समितीने विखे पाटील यांचे नाव सुचवले असून , ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे . हा निर्णय मराठा समाजाच्या दीर्घकालीन लढ्याला यश मिळवून देणारा ठरू शकतो . मात्र , अंमलबजावणीच्या टप्प्यावर पारदर्शकता आणि गतिमानता असावी , अशी अपेक्षा मराठा समाजाची आहे . मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने सरकारवर दबावनिर्माण केला असून , आता सर्वांचे लक्ष शासन निर्णयाच्या अंमलबजावणीवर आहे . मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल , अशी आशा व्यक्त केली जात आहे .

You Might Also Like

पालखी मार्गाची दुर्दशा हे विद्यमान सत्ताधार्‍यांचे अपयश – प्रितसिंह खानविलकर

भारताकडून पाकीस्तानवर एअर स्ट्राईक , सैन्य दलाकडून ‘ ऑपरेशन सिंदूर ‘ यशस्वी ; भारतीय सशस्त्र दलांनी दहशतवादी छावण्यांवर अचूक केला हल्ला

एका राजकीय पुढायाच्या मोठ्या कंपनीचे लेटर दाखवून वेगवेगळ्या बड्या अधिकाऱ्यांनंतर छत्तीसगडच्या उद्योजकाला घातला कोटींचा गंडा बारामतीच्या लखोबा लोखंडेचे अनेक प्रताप उघड

मी हार मानणार नाही- आ . रामराजे ना . निंबाळकर

रेशनदुकानदारांना अजित पवारांकडून गिफ्ट, कमिशनमध्ये घसघशीत वाढ; मंत्रालयातील बैठकीत निर्णय

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
फलटण

ज्येष्ठ पत्रकार रमेश आढाव यांचे निधन

Prashant Ahiwale Prashant Ahiwale July 18, 2025
भारताकडून पाकीस्तानवर एअर स्ट्राईक , सैन्य दलाकडून ‘ ऑपरेशन सिंदूर ‘ यशस्वी ; भारतीय सशस्त्र दलांनी दहशतवादी छावण्यांवर अचूक केला हल्ला
सौ.अनिता प्रशांत काकडे यांना भाजपकडून नगरपालिका उमेदवारी द्यावी भाजपा कार्यकर्त्यांची ठाम मागणी
फलटण नगरपरिषदेची मुजोरी आणि ठेकेदाराचे ‘लाड’कोण करित आहे..प्रभाग १० मधील जनतेला आता आत्मदहनाचाच पर्याय?
शरद पवार-अजित पवार यांच्यात एकत्रित बैठक
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account