फलटण । दि . 4 नोव्हेंबर 2025 1 ” फलटणला काल नाटकाचा एक अंक झाला . त्यामध्ये दुधाने अभिषेक आणि रडण्याचं नाटक झालं . त्यांचा तो अभिनय ‘ ऑस्कर ‘ देण्यासारखा होता ” , अशी मिश्किल टिका सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केली . महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरुन रोज नवीन राजकीय आरोप होत असताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काल दि . 3 रोजी फलटणच्या गजानन चौकात जाहीर पत्रकार परिषद घेतली होती . या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांमागे विधान परिषदेचे माजी सभापती आ . श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असल्याचा जाहीर आरोप रणजितसिंह यांनी केला होता . त्याला उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेतश्रीमंत संजीवराजे बोलत होते . यावेळी आ . श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते
श्रीमंत संजीवराजे म्हणाले , ” महिला डॉक्टरांचे घडलेले प्रकरण दुर्दैवी आहे . त्यावरुन सुरु असलेले आरोप – प्रत्यारोपही दुर्दैवी आहेत . हे प्रकरण झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा रामराजेंनीच पत्रकार परिषद घेतली होती . त्यामध्ये त्यांनी केवळ सखोल चौकशीची मागणी केली होती . त्यानंतर सदर महिला डॉक्टरांचे काही लेखी खुलासे माध्यमांनी समोर आणले . त्यानंतर माजी खासदारांवर आरोप सुरु झाले . तेखुलासे पत्रकारांनी बाहेर काढले आणि ते आता रामराजेंना यासाठी जबाबदार धरत आहेत . त्यांनी या प्रकरणात रामराजेंना मास्टरमाईंड म्हणणे मुर्खपणाचे आहे . ” “ दिगंगबर आगवणे त्यांचे कार्यकर्ते होते , त्यांच्या व्यवहारात आमचा काहीही संबंध नाही . त्यांच्या कुटूंबांचा आक्रोश बाहेर येतोय त्यालाही ते रामराजेंनाच जबाबदार धरत आहेत . पण मग ज्यावेळी आगवणेंनी रामराजेंच्या विरोधात उपोषण केलं होतं त्यावेळी त्यांनी विष घेण्याचा प्रयत्न केला होता ; त्यामागे कोणाचा मास्टरमाईंड होता ? ” , असा सवालही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी उपस्थित केला . ” कोणत्याही विरोधकाला आम्ही अशा पद्धतीने डॉमीनेट केलेले नाही . लोकांचा निर्णय स्वरुकारुन आम्ही पुढे जातो . कुणालाही अकारण बदनाम करण्याची आमची संस्कृती नाही . कुठं तरी विषयांतर करुन मी त्यातला नाही ; असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे . याआत्महत्या प्रकरणातील सर्व प्रश्नांची चौकशी व्हावी एव्हढीच आमची अपेक्षा आहे . जर नार्को टेस्ट करायची असेल तर त्यांच्यावर आजवर झालेल्या सर्व आरोपांपासून व्हावी ” , असेही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी स्पष्ट केले .



