By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: दिवाळीनंतर राजकीय फटाके , आचारसंहितेचा कालावधी लांबणार , महापालिका निवडणूक कधी ? तीन टप्प्यांचा प्रस्ताव समोर
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > प्रशासकीय > दिवाळीनंतर राजकीय फटाके , आचारसंहितेचा कालावधी लांबणार , महापालिका निवडणूक कधी ? तीन टप्प्यांचा प्रस्ताव समोर
प्रशासकीय

दिवाळीनंतर राजकीय फटाके , आचारसंहितेचा कालावधी लांबणार , महापालिका निवडणूक कधी ? तीन टप्प्यांचा प्रस्ताव समोर

Prashant Ahiwale
Last updated: September 18, 2025 7:43 am
Prashant Ahiwale Published September 18, 2025
Share
SHARE

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पाडण्याचे नियोजन राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू आहे . त्यानुसार , मुंबईसह २ ९ महापालिकांच्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यात म्हणजे जानेवारी २०२६ मध्ये घेतल्या जाणार असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते . दिवाळीनंतर लगेचच पहिल्या टप्प्यात , नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय फटाके फुटणार आहेत . विशेष म्हणजे , या निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहितेचा कालावधी लांबण्याची शक्यता असून , त्याचा फटका विकासकामांना बसणार असल्याचे बोलले जात आहे .

न्यायालयाचा आदेश महापालिका , नगरपालिका , नगर पंचायती , जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका बरीच वर्षे रखडल्या असून , आता पुढील वर्षी ३१ जानेवारीच्या आत या निवडणूका घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे . सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची लेखी प्रत अद्याप आयोगाला प्राप्त झालेली नाही . तथापि , न्यायालयाचे निर्देश लक्षात घेऊन आयोगाकडून तीन टप्प्यांत निवडणुका घेण्याबाबतचे नियोजन करण्यात येत आहे .

आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील . दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाईल . शेवटच्या टप्प्यात २ ९ महापालिकांच्या निवडणुका घेण्याच्या निर्णयाप्रत निवडणूक आयोग आला आहे . याबाबतचा अधिकृत प्रस्ताव लवकरच राज्य सरकारला देण्यात येणार असून , यात प्रस्तावित निवडणूक कार्यक्रमाची इत्थंभूत माहिती आयोगाकडून राज्य सरकारला दिली जाईल .

आयोगाकडून तयारी मुंबई आणि इतर २ ९ महापालिका निवडणुकांच्या तयारीला काहीसा अवकाश आहे . मात्र , जिल्हा परिषदा ; तसेच नगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व तयारी जवळपास होत आली आहे . त्यामुळे पहिल्या दोन टप्प्यांत या निवडणूक पार पडणार आहेत . तर , येत्या ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबई महापलिका तसेच इतर महापालिकांच्या प्रभाग रचेनेचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे समजते .

आचारसंहिता क्षेत्रापुरतीच तीन टप्प्यांतील निवडणुकांमुळे राज्यात नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान निवडणूक आचारसंहिता लागू राहण्याची शक्यता आहे . अर्थात ही निवडणूक आचारसंहिता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रापुरती लागू असणार आहे . शिवाय राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशनही छोट्या कालावधीचे करण्यात येणार असल्याचे समजते .

राज्यात सन २०२२ पासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घ्याव्यात , ‘ असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत . ‘ यापुढे या निवडणुकांसाठी मुदतवाढ दिली जाणार नाही . सर्व प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण कराव्यात , ‘ असे न्यायालयाने बजावले होते . न्यायालयाने या वेळी राज्य निवडणूक आयोगाला फटकारले होते . याशिवाय सरकारच्या कार्यशैलीवरही नाराजी व्यक्त केली होती . न्यायालयाने मे महिन्यात एक अंतरिम आदेश दिला होता . यामध्ये चार महिन्यांत म्हणजे सप्टेंबरच्या आत निवडणुका घेण्याचा निर्देश देण्यात आले होते .

You Might Also Like

डि वाय एस पी राहुल धस यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज देयक तिप्पट ; मुंबई , पुणे , नागपुरात , कामगार संघटनाच म्हणते ..

गुणवरे गावचे अमोल आढाव यांची फलटण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड .

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदी तुषार दोशी

माजी प्रांत सचिन ढोले यांची मुंबई उपनगराच्या अप्पर जिल्हाधिकारी पदी पदोन्नतीने नियुक्ती

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
राजकीय

लाडक्या बहिणींसाठी मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवला

Prashant Ahiwale Prashant Ahiwale May 4, 2025
स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज देयक तिप्पट ; मुंबई , पुणे , नागपुरात , कामगार संघटनाच म्हणते ..
फलटण तालुक्यात आपदग्रस्तांना प्रशासनाकडून दिलासा
गोविंद मिल्क चा ३० वा वर्धापनदिन सोहळा मा . आमदार श्रीमंत रामराजे नाईक – निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न
भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीपकुमार जाधव यांचा भाजपला रामराम
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account